वर्तक नगर चे साईबाबा...

वर्तक नगर च्या साईबाबांचा २४ वा वर्धापन दिवस.

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वर्तक नगर च्या साईबाबांचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा झाला. शिर्डी च्या साईबाबांची प्रतिकृती असलेले वर्तक नगरचे साईबाबा म्हणजे इथल्या भक्तांची प्रती शिर्डीच. मराठी तिथी नुसार साईबाबांचा वर्धापन दिवस साजरा होतो. २९ नोव्हेंबर पासून सुरु झालेला हा उत्सव ३ दिवस चालला आणि आज त्याची सांगता झाली. तिसऱ्या दिवशी बाबांची मंदिरातून पालखी निघते आणि वाजतगाजत मोठ्या थाटामाटात तिची पूर्ण वर्तक नगर मध्ये मिरवणूक निघते. हि मिरवणूक पुढे जानका देवी च्या मंदिरात जाऊन परत साईबाबांच्या मंदिरात परतते. ह्या वेळेला रस्त्यावर मोठ्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढल्या जातात. पुण्यावरून खास ढोल ताशे बोलावले जातात. सुंदर आतिषबाजी केली जाते. दांडपट्टा चालवणारे, लेझीम खेळणारे, तलवार चालवणारे अनेक कलाकार आपली कला दाखवतात. एकंदरीत खूप रम्य आणि पाहण्यासारखा सोहळा असतो. ऑफिस मधून येईपर्यंत पालखी अर्ध्याहून पुढे निघून जाते. पण आज नशिबाने दर्शन मिळाले. माझ्या जुन्या घराच्या समोरच पालखी पोहोचली होती. चांगले दर्शन झाले. पालखी सोहळ्याचे दृश्ये आणि बाबांच्या मंदिरातली काही इथे पोस्ट केली आहेत.

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Read More

यारी कि गाडी...

हिरो होंडा ची नवी जाहिरात यारी कि गाडी बघितली आहे का?


तब न स्पीड ब्रेकर होते थे, न नो एन्ट्री
अपनी यारी कि गाडी फुरररररर सी चलती थी.
पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों
राहे बदल देता है

यारी बुला रही है....राहे दिखा रही है..
चलते ते हम जो बिछडे तो ये
ये गाडी मिला रही है....

जितनी दूर ये यारी जाये
उतनी दूर ये गाडी जाये
हिरो होंडा स्प्लेंडर ....यारी कि गाडी

आतापर्यंत पाहिलेल्या जाहिरातीतील हि सर्वात आवडती जाहिरात. सुंदर संकल्पना, सुंदर सादरीकरण, सुंदर संगीत आणि शेवटी हृदयाला स्पर्श करणारा फील.
तीन मित्र भर पावसात लहानपणी गल्लीत खेळताहेत. दोघे बसले असतात आणि तिसरा मित्र फुरररर करत गाडी चालवत येतो. बाकीचे पण त्याला सोबत देत गल्लीत गाडी चालवत फिरतात व एका चौकात बाहेर पडतात. पण तिघे तीन रस्त्याने जातात. त्यावेळेला तिघे आश्चर्यचकित होउन एकमेकांकडे बघतात. तेव्हा त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव खूप छान दाखवले आहेत. त्याच वेळेला बॅकग्राउंडला आवाज येतो.पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों.... राहे बदल देता है.
तेच मित्र मोठेपणी आपापल्या कामधंद्यात असताना त्यांना ते दिवस आठवतात. बाहेर पण तसाच पाउस पडत असतो. खिडकीतून बाहेर बघितली तर गाडी दिसते. तशीच गाडी काढून सर्व मित्र त्याच चौकात भेटायला येतात. तिघांन पैकी एका मित्राची पॅंट वर करायची जी सवय असते ती अजून गेलेली नसते. तसेच फुररर्र्र करत गाडी चालवत गल्लीत फिरतात. शेवटी एकमेकांना येऊन मिठ्या मारतात. मानवी भावनांचे खूप सुंदर चित्रण...

ती जाहिरात माझ्या Youtube च्या साईट वर टाकली आहे.


माझ्या मित्रांना पण हेच सांगावेसे वाटते कि जरा जुन्या आठवणी जागवून पहा. ते तलावपाली वर फिरणे, कॉलेज बंक करून लायब्ररीत जाऊन बसने, बस स्टॉप वर तासनतास बस ची वाट बघत बसने, एक रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे, आणि एक रुपयात सुद्धा किती कमी दिले असे बडबडत सगळे शेंगदाणे खायचे , त्यावेळेला दिवसातून १० ते १२ तास तरी एकत्र असायचो आज सहा महिन्यातून एकदा भेटायला होतेय ते सुद्धा कोणाचाना कोणाचा तरी प्रोग्राम चेंज झालेला असतो. जरा काही आठवत असेल तर बघा आठवून आणि आपापल्या गाड्या कडून या तलाव पाली ला भेटायला.
वरच्या जाहिरातीतील एका मित्राला गीटार वाजवता येत असते. माझ्या पण एका मित्राला गीटार वाजवता येते पण साल्याने कधी मनापासून तिकडे लक्षच दिले नाही. (हा ब्लॉग वाचणारे कुणी नसते तर जरा अजून शिव्या घातल्या असत्या). कधी आमची मेहफिल जमलीच नाही. त्यावेळेला वेळ होता, भेटी होत होत्या पण मजा करायला पैसा नव्हता, आज पैसा आहे तर वेळ नाही आहे भेटायला.

माझ्या सर्व मित्रांना हेच सांगणे आहे कि वेळ काढा आणि जे काही थोडेफार मित्र उरले आहोत आणि जी काही मैत्री उरली आहे ती टिकवून ठेवा. उद्या असे नको व्हायला कि पैसा कमावता कमावता, सर्व मित्रांना सोडून उंच शिखरावर जाऊन पोहोचाल, पण मागे वळून बघाल तर आम्ही शिखराच्या पायथ्याशी पण नाही दिसणार. त्यावेळेला खूप एकटे एकटे वाटेल, मित्रांची गरज भासेल पण जवळ कोणी नसेल....
जमले तर विचार करा.....आणि आपल्या आवडत्या व्यक्ती साठी,मित्रासाठी जरुर वेळ काढा...आयुष्य खूप छोटे आहे आणि वेळ खूप कमी आहे.

Read More

ह्या दिवाळीचा आकाश कंदील...


मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि कंदील बनवण्याचे ठरवले होते. पण वेळ चा नव्हता मिळत. ऑफिस मध्ये इंटरव्यू असल्याने अभ्यासाची तयारी करण्यातच वेळ जात होता. धनत्रयोदशीच्या दिवशी पर्यंत कंदील तयार झाला नाही त्यामुळे बायकोचे ओरडणे चालू झाले होते. कंदील कधी लावणार? दिवाळी झाल्यावर बनवणार काय? तुझे तर नेहमीच असे असते.... जगाच्या मागून वगैरे वगैरे. मला माहित होते कि मी एकदा बसलो तर ३/४ तासात कंदील बनवून होईल पण वेळच नव्हता भेटत. शेवटी धनत्रयोदशीच्या दिवशी बायकोने शेवटची ऑर्डर सोडली कि आज नवीन कंदील बाजारातून विकत घ्यायचाच, मी मग बिचारा काय करणार ? पण म्हणालो आजचा दिवस दे आज रात्री कंदील बनवूनच टाकतो. मागच्या वर्षी पण असाच आकाश कंदील बनवला होता. तो एवढा चांगला नव्हता झाला. ह्या वर्षी बांबू च्या काठ्यांचा बनवायचा होता. पण शेवटच्या दिवसा पर्यंत काठ्या काही मिळाल्या नाहीत. मग शेवटी ठरवले कि साधा वालाच आकाश कंदील बनवायचं. विचार आला चला, त्या निमित्ताने ब्लॉग लिहायला एक विषय भेटला. मी कंदील बनवायचा केलेला प्रयत्न इथे दिलेला आहे.

वापरलेले साहित्य : पुठठा किंवा कार्डबोर्ड पेपर, पतंगी पेपर, कैची, कटर, स्टेपलर, फेविकॉल,एक सोनेरी पेपर, धागा, करकटक.

सर्व प्रथम पुठठा घेऊन त्याच्या समान आकाराच्या दोन पट्ट्या कापल्या. कंदिलाचा जेवढा व्यास आपल्याला ठेवायचा असेल तेवढ्या आकाराच्या पट्ट्या कापाव्यात.

ह्या पट्ट्यांना गोलाकार करून त्यांना फेविकॉल लावून स्टेपलर मारले. स्टेपलर मारल्याने फेविकॉल सुकायला वेळ मिळतो आणि गोल सुटत नाही.

त्यानंतर जेवढ्या मोठ्या आकाराचा कंदील बनवायचा असेल तेवढ्या आकाराच्या तीन पट्ट्या कापून घेतल्या.


पहिल्या गोलाकार पुठठयाच्या वर्तुळाला खाली ठेवून तीन समान अंतरावर ह्या पुठ्ठ्याला फेविकॉल लावून स्टेपलर मारले.

त्यानंतर दुसऱ्या गोलाकार पुठठयाला वर फेविकॉल लावून स्टेपलर मारले. हे पुठ्ठे थोडे मजबूत असणे जरुरीचे आहेत. नाहीतर वाऱ्याने कंदील फाटण्याची शक्यता असते.

हा कंदीलाचा सांगाडा तयार झाला.

ह्याच्या पुढचे काम थोडे किचकट आहे. आता कंदिलाच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. त्यासाठी एखादि सोपिशी नक्षी निवडावी जी काढायला सोपी असेल आणि कैची ने कापायला पण सोपी असेल. ह्यासाठी रद्दी च्या वर्तमान पत्रावर पहिले सराव करावा. त्यातून एक नक्षी ठरवावी आणि बाकीच्या पाकळ्या त्यानुसार बनवाव्या.


पेपर ला चार घडी अशा रीतीने मारावी कि ज्याने आपल्याला फक्त एका बाजूनेच कापावे लागेल आणि उघडल्यावर त्याची अख्खी पाकळी बनेल. हे जरा किचकट असले तरी सरावाने लवकरच जमते.


वर्तमानपत्रावर कापलेली नक्षी आधार म्हणून घेऊन सर्व पतंगी पेपर एकाच आकाराचे कापावेत.

कापलेली घडी उघडल्यावर पाकळी अशी दिसेल.




ह्या पाकळीची दोन्ही टोके फेविकॉल ने चिटकवून घाव्यीत. सर्व कामासाठी खळ अथवा फेविकॉल वापरावा, साधा गम वापरण्याचे टाळावे जेणेकरून कंदील वाऱ्यावर सुद्धा न फाटता चांगला राहतो.

नंतर सोनेरी पेपर चा ठिपके अथवा चौकोनी तुकडे कापून घ्यावीत आणि ते पाकळीवर अशा पद्धतीने चिटकवावीत.आपल्या कंदिलाच्या सांगाड्याचा घेर लक्षात घेऊन आवश्यक तेवढ्या पाकळ्या कापून तयार ठेवाव्यात.


नंतर आधी बनवलेल्या सांगाड्यावर एकामागून एक पाकळ्या शक्य तेवढ्या जवळ लावाव्यात. पाकळ्या जवळ लावल्याने कंदील भरगच्च वाटतो आणि मागील पुठ्ठ्याचा सांगाडाहि दिसत नाही.


नंतर सोनेरी पेपर च्या दोन पट्ट्या कापून घ्याव्यात. बाजारात मिळणाऱ्या सोनेरी पेपर ला पर्याय म्हणून गिफ्ट पेपर पण वापरू शकतो. मी सुद्धा सोनेरी रंगाचा गिफ्ट पेपर वापरला आहे. गिफ्ट पेपर ला जास्त चमक असते आणि आतमध्ये लाईट सोडली असता ती जास्त चमकून दिसते. फक्त हा पेपर जास्त लवचिक असल्याने कापताना जरा त्रास होतो. सरळ रेषेत कापायला जमत नाही. (शक्यतो सोनेरी पेपरच वापरावा कारण इतर चंदेरी आणि रंगीत पेपरने कंदील खुलुन दिसत नाही. मी ते सर्व प्रकार करून बघितले आहेत. सोनेरी पेपर चा चांगला वाटतो.)

सर्व पाकळ्या लावून झाल्यावर कंदील अश्या प्रकारे दिसेल. इथ पर्यंत कंदीलाचे ७०% हून काम पूर्ण होते.

आता कंदिलाच्या शेपट्या बनवायच्या. शेपट्या सरळ रेषेत येण्यासाठी पेपर ची अशा रीतीने घडी मारावी जेणेकरून आपल्याला फक्त तुकडाच कापावा लागेल.

समान अंतराचे तुकडे कापून ते मोकळे करावेत. अशा तऱ्हेने शेपट्या तयार होतील.

ह्या शेपट्या खालच्या बाजूने एकमेकांमध्ये अंतर न ठेवता आतल्या बाजूने चिटकाव्यावत.


कंदील जवळपास असा दिसेल.




त्याच्या वरच्या बाजूला कैचीने अथवा करकटकने छोटे छिद्र करून त्यात धागा ओवला. आत मध्ये बल्ब सोडला आणि अशा रीतीने कंदील तयार झाला.


आता सर्वात शेवटी हाताला लागलेला फेविकॉल काढत बसायचा मला हा टाईम पास खूप आवडतो.
|| शुभ दीपावली ||

Read More

वर्तक नगरची जानका देवी

परवा वर्तक नगरच्या (ठाणे) जानका देवी च्या मंदिरात गेलो होतो. हे मंदिर खूप जुने आहे. लहान पणी(म्हणजे अंदाजे १९८४ ते १९९० च्या काळात ) आम्ही ह्या मंदिरात महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी जायचो. शहरात असून सुद्धा एखाद्या गावात आल्यासारखे वाटायचे. कोंबड्याचे आरवणे, मातीचा सुवास,कौलारू मंदिर, पोटापर्यंत दाढी असलेले आणि मागे कंबरे पर्यंत केसांच्या जटा असलेले पुजारी बाबा, पुजारी बाबांनी पाळलेले व अंगावर येणारे पण न चावणारे कुत्रे, आजूबाजूला असलेले घनदाट जंगल, इंग्रजांच्या काळातले एक पडीक चर्च, भयाण वाटणारे त्याचे अवशेष, संध्याकाळी सात वाजताच पडणारा गुडूप अंधार.... सर्व काही डोळ्यासमोर तरळून गेले. जणू काही आताच काही महिन्यापुर्वी घडले होते. सर्व आठवणी उगाळत विजु बरोबर पायऱ्या उतरलो. त्यावेळचे मंदिर आणि आत्ताचे मंदिर ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला आहे. त्यावर केलेली प्रकाश योजना त्याचे सौंदर्य खुलवत होती.




मंदिरा पर्यंत जायचा मार्ग हि चांगला झाला होता. आता कार, बाईक अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकते. त्यावेळेला एक पैदल पूल होता. तो चढून मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता होता. गाडी जायला रस्ता नव्हता. मंदिराच्या समोरच एक चर्च आणि इंग्लीश शाळा आहे. त्या चर्च मध्ये व शाळेमध्ये यायला रस्ता विरुद्ध दिशेने आहे. पण त्या दिशेने मंदिरात यायला परवानगी नाही. मंदिरात यायचा पुल काही वर्षापूर्वी कोसळलाआणि त्या नंतर त्यावर नवीन पूल बांधला गेला. तो पूल मग गाडी ये जा करू शकते असा बांधला गेला त्यामुळे खूपच चांगले झाले.

मंदिरातून आत शिरलो आणि गाभाऱ्या पर्यंत पोचलो. पुजारी बाबांची आठवण झाली, ते गाभाऱ्यात पायांवर बसायचे आणि ओटी घ्यायचे. देवी पुढचे गंध भक्तांच्या कपाळाला लावायचे. गाभारा खूप छोटा होता आणि खूप अंधारात होता. त्यात एक छोटा बल्ब सोडलेला असायचा. आता त्याच गाभाऱ्याचे सौंदर्य खुलून आले होते. मातीच्या भिंती जाऊन तेथे मार्बल च्या भिंती आल्या आहेत. त्यात देवी चे रूप अजून खुलून दिसतहोते. चक्क गर्दी कमी असल्यामुळे आणि मी उशिरा गेल्यामुळे जास्त माणसे नव्हती.त्यामुळे चांगले फोटो काढता आले. खूपच प्रसन्न वाटले.




मंदिरा समोरच मैदान आहे. लहानपणी तेथे क्रिकेट चे सामने व्हायचे त्यावेळेला देवीचे दर्शन करायला जायचो. मधल्या काळात जवळपास कितीतरी वर्ष मंदिरात जाता आले नाही. खूप वर्षांनी गेल्यामुळे मन अजूनच प्रसन्न झाले. मंदिरातून निघताना बाहेर गोंधळी होते. हे गोंधळी थेट तुळजापूर वरून येथे येतात. नऊ दिवस त्यांचा इथेच मुक्काम असतो. दसरा झाला कि ते दुसर्‍या दिवशी आपल्या गावी परततात. त्यांचे हि छायाचित्र काढावेसे वाटले. त्यांच्या झोळीत दहा ची नोट टाकली तर त्यांनी आम्हा दोघांना अगदी भरभरून आशीर्वाद दिले.


तुळजापुरचे ग़ोंधळी.

तुळजापुरचे ग़ोंधळी.

तुळजापुरचे ग़ोंधळी.

त्यांचा आशीर्वाद घेऊन मंदिरातून बाहेर पडलो. विजूला हि मंदिर खूप आवडले. लग्न झाल्यापासून का नाही आणले एवढ्या चांगल्या मंदिरात? मी काय उत्तर देणार जे जे नशिबात असते ते ते त्याच वेळेला मिळते. मंदिरातून निघताना मन खूप जड झाल्यासारखे वाटले. मग विचार केला कि हे मंदिर आपलेच आहे. आपल्याच परिसरात आहे. कधी पाहिजे तेव्हा येऊ शकतो. तेव्हा कुठे मन हलके झाले. आणि आम्ही निघालो.

----

पुजारी बाबा व धर्मवीर आनंद दिघे ह्यांचा एक जुना फोटो.


झाडामध्ये आलेला ग़णपतीचा आकार

देवीची एक जुनी मुर्ती

शंकराची पिंड


Read More

देवियों और सज्जनों

देवियों और सज्जनों

ही हाक आता परत टीवी वर ऐकू येऊ लागली आहे. अमिताभ बच्चन परत कौन बनेगा करोडपति वर आला आहे.पहिला एपिसोड तर खुप चांगला झाला आहे. बघू आता पुढे काय काय करताहेत अमिताभजी.
ह्या वेळेला त्यांनी एक नविन शब्द दिला आहे... घड़ियाल बाबु.

Read More

एक दु:खद फोटो........

खुप दिवसापासुन लिहायचे होते. पण वेळ च नव्ह्ता भेटत. मना मध्ये खुप विचार घोळत असतात. पण लिहायला बसलो कि एक तर कंटाळा तरि येतो नाहितर काहि सुचतच नाहि. आज खुप वैताग आला होता. मुड नाहि होत आहे काहि करायला. त्यात हा फोटो बघितला. एवढा दु:खद फोटो कधिच बघितला नव्ह्ता. खुप वाईट वाटले हा फोटो बघुन.

देव पण एवढा निर्दयी कसा होउ शकतो. बिचारा त्याला समजले पण नसेल कि आपण आत मरणार आहोत. कदाचित कुठे बाहेर फिरायला जायच्या तयारीत असेल. पायात चप्पल घालुन तयार होता. कदचित शेवट्च्या क्षणि त्याला समजले असेल. घाबरुन त्याने आपली हाफ पँट आपल्या ईमुकल्या हातात घट्ट पकडली आहे. दुसर्‍य़ा हाताने कोनाला तरी बोलवायचा प्रयत्न केला असेल. म्हणुन हात मोकळा आहे. तो क्षण कसा असेल जेव्हा त्याने शेवट्चे डोळे मिटले असतील ? त्याचे आई वडिल समोर असतील का ? त्यांना काय वाटले असेल ? आपल्या मुलाचा मृत्य आपल्या डोळ्यांनि बघताना ?

असे वाटतेय उगाच हा फोटो बघीतला. उगाच एक बेचैनी लागुन राहली आहे.


Read More

ने मजसी ने परत मातृभूमीला

'ने मजसी ने' ह्या स्फुर्ती गीताला 100 वर्षे पुर्ण झाल्याबद्द्ल हे काव्य....


ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला

Read More