भारत पाकिस्तान सेमी फायनल

भारत पाकिस्तान च्या सामन्यावर खूप काही लिहिले गेले आहे. मी लिहायचा विचार केला कारण कालचा दिवस खूप चांगला गेला. त्याच्या आठवणी चांगल्या कोरून राहाव्या म्हणून विचार केला लिहून काढाव्या. आता लहान असलेली जनरेशन किंवा पुढे येणारी जनरेशन नी विचारले कि भारत पाक ची सेमी फायनल कशी होती तर सांगता आली पाहिजे म्हणून लिहून ठेवावीशी वाटतेय. काय भरवसा परत पाक भारत समोर कधी येईल आणि काही दिवसांनी तर तो देशाच्या नकाशावरूनच गायब होण्याची भीती वाटते.

सामना चालू व्हायच्या आधीच २ दिवसापासुन सुट्टी मिळेल कि नाही ह्याची चर्चा चालू होती तेवढ्यात पाक ने त्यांच्या इथे राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली ऐकून आपल्याकडे का नाही झाली ह्याची गरमागरम चर्चा चालू होती. ऑफिस मध्ये काही मित्रांनी सुट्टी टाकली पण, आणि साहेब लोकांनी इमानदारीत मान्य पण केली. माझा एक मित्र म्हणाला कि तू सुट्टी घेऊ नको करून तू सुट्टी घेतली कि आपण हरतो. (आमच्या ऑफिस मध्ये इंटरनेट सर्वाना दिलेले नाही आहे आमच्या ग्रेड ला नाहीच नाही. सुदैवाने एकदा मोठा बॉस खुश असताना त्याच्या कडून परवानगी घेऊन ते चालू केले होते. त्यामुळे मी मटा च्या साईट वर स्कोर बघून सर्व मित्र मैत्रिणींना फटाफट फोरवर्ड करत असतो. अगदीच क्रुशिअल सामना असेल तर रेडीओ वर कॉमेंट्री ऐकत मेल वर लिहून पाठवतो. आमच्या ऑफिस मध्ये क्रिकेट संदर्भातल्या सर्व साईट सर्वर पातळीवरच बंद करून ठेवल्या आहेत. नशिबाने मटा चालू असते म्हणून स्कोर मिळतो.)  तर गेल्या काही महत्वाचे सामन्याची मी रनिंग कॉमेंट्री करून सर्वाना अपडेट देत असतो. काही सामन्याच्या वेळेला माझे महत्वाचे काम असल्यामुळे मी सुट्टीवर होतो आणि त्यादिवशी सामना हरलो होतो. असे दोन तीन वेळा झाले ते सुद्धा त्याच मित्राने दर्शविले. तेव्हापासून काही महत्वाचे सामने असेल तर मी सुट्टी घेतच नाही, भले मला बघायला मिळाले नाही तरी चालेल. अर्थात सुट्टी जर ऑफिशिअल असेल तर तो अपवाद असतोच. त्यामुळे ह्या वर्ल्ड कप चे सामने बघायला तरी मिळाले.

तर मित्राने आठवण करून दिल्यामुळे मी सुट्टी टाकायचा विचारच रद्द केला आणि ऑफिस मध्येच राहायचे ठरवले. ऑफिस मध्ये टीवी चा बंदोबस्त होत होता त्यामुळे काही काळजी नव्हती. सकाळपासून सामन्याचे वेध लागले होते. बस, ट्रेन सगळीकडे तीच चर्चा चालू होती. भारतात एका अभूतपूर्व बंदला सुरुवात होणार होती. असा बंद जो कुठल्याही राजकीय पार्टीने पुकारला नव्हता आणि तरी त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळेल ह्याची खात्री होती, मोठमोठ्या खाजगी ऑफिसेस नी आधीच सुट्टी जाहीर केली होती. काही ऑफिसेस नी अर्धा दिवसाची सुट्टी दिली होती. ज्यांना पूर्ण दिवस होते ते मनातल्या मनात शिव्या घालत कामावर येणार होते. रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने हे रस्त्यावर काढणार नव्हते. सर्व राजकीय नेते रस्त्यावर न उतरता घरात टीवी समोर बसून राहणार होते. मॉल, मल्टीप्लेक्स सगळी रिकामी होणार होती. जिथे टीवी किंवा स्क्रीन चा बंदोबस्त केला होता तिथेच फक्त गर्दी दिसणार होती. रस्ते दोन नंतर ओस पडणार होते, सदानकदा भरलेल्या मुंबईच्या लोकल रिकाम्याच धावणार होत्या. एका अभूतपूर्व बंद ला सुरुवात झाली होती.

ऑफिस मध्ये पोचल्यावर एक सुतकी वातावरण होते. सुट्टी दिली नाही ह्याचे सुतक होते. जसे जसे घड्याळाचे काटे सरकु लागले तस तसे हृदयाच्या धडधडी वाढू लागल्या. एक वाजायच्या आताच जेवणं उरकून घेतली. मटा ची साईट चालू केली आणि बसलो. धोनीने अश्विन ला काढून नेहरा ला घेतले हि बातमी ऐकूनच डोके फिरले म्हटले ह्या माणसाला झालेय काय? सामना जर हातातून गेला तर नक्कीच हा शिव्या खाणार. पण बहुतेक नशीब त्याच्या बाजूने होते. टॉस जिंकून भारताने फलंदाजी घेतली ऐकून आनंद झाला चला सचिन ला सेन्चुरी करायला संधी मिळेल.
india_vs_pakistan_images

पहिले काही ओवर रेडीओ वर ऐकून तर अंगावर काटेच मारायला लागले म्हटले सेहवाग ची अशी फलंदाजी बघायला घरीच राहायला हवे होते. पण काय करणार बॉस समोरच बसून होता स्वत: पण टीवी बघायला जात नव्हता आणि त्यामुळे आम्ही पण जाऊ शकत नव्हतो. शेवटी मनाचा  हिय्या करून आम्ही दोघा तिघांनी टीवी बघायला जाऊ का विचारले आणि परवानगी मिळाली. तसाच धावत जेवायच्या रूम मध्ये जिथे टीवी लावला होता तेथे पळालो. तेथले वातावरण बघून अंगावर सर्रकन काटा मारून गेला, सेहवागने नुकतेच ५ चौकार मारले होते आणि सर्वच नाचत होते. आम्ही पण जाऊन सेलेब्रेशन करायला सुरुवात केली. पुढच्याच ओवर मध्ये सेहवाग ने उपर कट मारला आणि आम्ही एवढा गोंधळ घातला कि विचारायलाच नको,. प्रत्येक बॉलला गोंधळ चालू होता आणि अचानक सेहवाग पायचीत झाला आणि शांतता पसरली. सेहवाग ने रेव्ह्यू घेतला पण त्यात पण आउटच झाला. पुढची सर्व भिस्त आणि सचिन वर राहिली. पण पीच ला चांगला टर्न मिळत होता पाहिजे तसे शॉट बसत नव्हते.

current-pakistan-india-semi-final-photosआणि सामान्यातले दोन महत्वाचे बॉल ११ व्या षटकात टाकले गेले. अजमल च्या गोलंदाजी वर सचिन ला पायचीत दिले गेले आणि सर्व पाकड्यांनी स्टेडियम वर गोंधळ घालायला सुरुवात केली. पाक मध्ये तर नक्कीच फटाके फोडले गेले असतील. सचिन गंभीर कडे आला आणि त्याच्याशी चर्चा केली रिव्यू घ्यायचा कि नाही करण सेहवाग चा रिव्ह्यु फुकट गेला होता. शेवटी सचिनने रिव्ह्यू मागितला आणि स्क्रीन वर दिसायला लागले कि सचिन आउट नाही आहे मग जो भारतीयांनी गोंधळ घातला त्यामध्ये पाकचा आवाज कुठल्या कुठे दाबून गेला. सर्व शांत होत नाही तोपर्यंत त्याच धावसंख्येवर आणि अगदी अजमलच्या पुढच्याच चेंडूवर सचिन थोडा पुढे सरसावला आणि यष्टीरक्षक कामरान अकमलने बेल्स उडविल्या,परत टीवी अंपायर कडे निर्णयासाठी गेला. पण सचिनचा पाय त्याआधी क्रीझमध्ये पोहोचला होता आणि अशाने जल्लोषाला डबल उधान आले. अगदी नाचून, बिचून बोंबा मारत आम्ही गोधळ घातला तेसुद्धा काही सिनिअर बॉस लोक समोर असताना. त्यांनी सुद्धा अगदी मनापासून दाद दिली.

नशीब अंपायर रिव्ह्यू सिस्टीम चालू केली नाहीतर सचिन अशा बाबतीत खूप अनलकी असतो. आउट नसताना त्याला आउट द्यायची अंपायर लोकांना खूप आवड असते साले मोठ्या फुशारकीने सांगत असतील कि मी सचिन ला आउट दिले आहे.  पण कालचा दिवस सचिन चा होता एक नाही दोन नाही तब्बल सहा वेळा त्याला जीवदान भेटले. काल खरच देवच मैदानात फिरत असावा.  जसे ब्रह्मा वर संकट आले कि विष्णू धावत येतो, विष्णू वर आले कि शिवा धावून येतो तसेच क्रिकेटच्या ह्या देवाला सुरक्षा कवच घालून एखादा देवच मैदानावर फिरत असणार. म्हणून तर साधे साधे झेल पाकड्यांच्या हातून सुटत होते.

7829821सेहवाग गेल्यावर भारतीय फलंदाजी पुढे बहरलीच नाही. युवराज तर भोपळा न फोडता परतला होता. गंभीर, कोहली, युवराज, धोनी थोड्या थोड्या वेळाने परतले. पुढे रैनाने चिवटपणे मैदानावर उभा राहून स्कोर २६० वर नेला. घरी यायला बस मध्ये बसलो रस्त्यावर काही मोजके वाहने सोडले तर कोणीही नव्हते. दररोज  कमीतकमी १ ते दीड तास लागतो तिथे काल फक्त ३५ मिनिटात घरी पोचलो. पूर्ण हायवे रिकामा....सातच्या आत घरात. नुकतीच पहिली ओवर टाकून झाली होती. मग टीवी समोर बसून राहिलो ते ४० ओवर संपे पर्यंत उठलोच नाही. नेहरा, हरभजन आणि मुनाफ ची चांगली गोलंदाजी आणि रैना, कोहली ची चांगली फिल्डिंग बघून आनंद झाला. सचिनला मैदान वर बघताना छान वाटत होते. एवढी वर्षे झाली तरी अजून नवीन खेळाडू असल्याप्रमाणे प्रत्येक बॉलवर चांगली फिल्डिंग करतोय, बॉलरला येऊन टिप्स देतोय, कोणाकडून फिल्डिंग चुकली तर हाताच्या खुणा करून सांगतोय. पाक समोर खेळताना ह्या पठ्ठ्याला काय होते काय माहिती आपले जे काही खास शस्त्र, अस्त्र असतील ती सर्व काढून पाकी खेळाडूंवर तुटून पडतो. ह्या माणसाची भूक कधी थांबणार ? देव करो ह्याचा फिटनेस असाच राहो आणि हा अशा हजारो सामने खेळो.

7829812सामन्याचा आनंद लुटण्यासाठी काही राज्यकर्त्यांनी रस्त्यावर मोठे मोठे स्क्रीन लावले होते. आमच्या नाक्यावर सुद्धा अशी स्क्रीन लागली होती आणि तिथून मोठा गोंधळ ऐकायला येत होता म्हणून कपडे करून खाली जाऊन उभा राहिलो रस्त्यावर हि गर्दी पसरली होती. मी पण त्या गर्दीचा एक भाग होऊन गेलो. मित्र एकमेकांना फोन करून बोलवत होते, अरे !घरात काय बघत बसलाय येथे रस्त्यावर ये...काय धमाल येतेय बघ. आता प्रत्येक डॉट बॉल वर आनंद साजरा होत होता. गर्दी मध्ये एक माणूस होता, कोण होता ते दिसला नाही पण आपल्या फाटक्या आवाजात बॉल टाकायच्या आधी एका विचित्र टोन मध्ये 'आता आउट', 'आता आउट' असे ओरडायचा आणि नेमकी त्या वेळेला विकेट पडायची आणि सर्व लोक गोंधळ घालायचे. मला शेवट पर्यंत त्याचा चेहरा दिसला नाही. पण मजा येत होती तो जेव्हा बोलायचं तेव्हा विकेट पडायची जणू काय ह्याला स्वप्नात दिसत होते. तो पण साला पठ्ठ्या प्रत्येक बॉलला बोलायचं नाही. पब्लिक ने सांगितले तरी नाही बोलायचा, जेव्हा त्याच्या मनाला येईल तेव्हाच बोलायचा आणि विकेट काढायचा.

78299097829839खरच असे सामने एकटे बघण्याला काहीच मजा नसते. शेवटी सामना जिंकल्यावर लोकांनी खुर्च्या घेऊन नाचायला सुरुवात केली, फटाक्यांच्या माळा लागल्या, आकाशात रॉकेट सोडली गेली रस्त्यावर दिवाळी साजरी व्हायला सुरुवात झाली. भारत फायनलला गेला ह्याचा आनंद नव्हता तर पाकला चिरडले ह्याचा आनंद सगळ्यात जास्त होता. आईस्क्रीम ची दुकाने, वाईन शॉप वर थोड्याच वेळात गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. पाकला चिरडण्यात आमच्या सचिनचाच मोठा वाटा होता आणि त्याने हि सांगितले कि पाक विरुद्ध खेळलेले सर्व सामने आणि मिळवलेले विजय हे संस्मरणीय आहेत. धन्यवाद सचिन तुझ्यामुळे आमच्यासाठीहि काही संस्मरणीय आठवणी आहेत.

Read More

हृदय विकाराचा झटका येण्यापासून कसे वाचवाल?

Dr. Devi Shetty.
गेले काही दिवसांपासून नात्यातले आणि मित्र परिवारातील लोकांना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. महाशिवरात्रीच्या आधी माझ्या चुलत काकांना आला,एका मित्राच्या आजीला आला, दुसरे एक मोठे काकांना वेळेत उपचार झाल्यामुळे त्रास झाला नाही. काल एका मित्राच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. आताच त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊन बघून आलो. सर्व जवळपास ६० वयाच्या पुढचेच आहेत. ह्या वयात त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात. गेल्या काही दिवसापासून मी नेट वर शोधातच होतो कि ह्या हृदयविकारापासून वाचण्यासाठी काय करायचे त्याच वेळेला फॉरवर्डेड ईमेल मध्ये डॉ देवी शेट्टी ह्याच्याबरोबर झालेल्या मुलाखतीचा गोषवारा आला. डॉ देवी शेट्टी हे नारायण हॉस्पिटल बंगलोर मधील मुख्य हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांच्याबद्दलची जास्त माहिती ह्या लिंकवर दिलेली आहे. 

त्यांना विचारलेल्या प्रश्नोत्तरांचे भाषांतर येथे देत आहे. सर्वात शेवटी मूळ इंग्लिश चर्चा हि जोडत आहे.

प्रश्न: हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचण्याचे काही मुलभूत नियम आहेत काय?
उत्तर: 
1. आहार - कार्बोहाइड्रेट कमी , प्रोटीन अधिक, आणि तेलकट पदार्थ कमी  
२.  व्यायाम - एक ते अर्धा तास दररोज चालणे, कमीत कमी आठवड्यामधून पाच दिवस तरी  चालावे.लिफ्ट चा वापर टाळावा. जास्त वेळ एकाच जागेवर बसने टाळावे. 
3. धूम्रपान सोडावे. 
4. शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवावे.
5. रक्तदाब वर नियंत्रण आणि शुगर कमी करावी.

प्रश्न: मांसाहारी (मासे) खाने हृदयासाठी चांगले आहे का ? 
 उत्तर: नाही.

प्रश्न: कधी कधी शरीराने सशक्त किंवा उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तीला सुद्धा हृदयझटका येण्याचे उदाहरणे दिसतात. झटका येण्याचे काही कारण असते का?
उत्तर: ह्याला मूक आक्रमण म्हणतात, ह्यासाठीच आम्ही ३० वर्ष वरील सर्व व्यक्तींना नियमित आरोग्य तपासणी करण्याची सिफारिश करतो.

प्रश्न:  हृदय रोग वंशपरंपरागत असतो का ? 
उत्तर: होय.

प्रश्न: हृदयावर जोर, तणाव (stress) पडण्याचे कारण काय असू शकतात ? हा तणाव कसा मिटवू शकतो?
उत्तर: जीवनच्या प्रति आपला दृष्टिकोण बदला. प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता (perfection) आणण्याचा प्रयत्न करू नका.

प्रश्न: जॉगिंग आणि चालणे ह्यात चांगले काय आहे? किंवा त्याहून चांगला व्यायाम आहे का? 
उत्तर: जॉगिंग पेक्षा चालणे नेहमीच चांगले असते. जॉगिंग ने लवकर थकायला होते आणि सांधे दुखी वाढू शकते. 
 
प्रश्न: तुम्ही गरीब आणि जरुरतमंद लोकांसाठी खूप काही केले आहे तुम्हाला असे करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? 
उत्तर: मदर तेरेसा, जी माझी पेशंट होती.

प्रश्न: कमी रक्तदाब असलेल्या रोग्यांना हृदय झटका येऊ शकतो का ? 
उत्तर: अत्यंत दुर्लभ

प्रश्न: कोलेस्ट्रॉल कधी पासून जमा व्हायला सुरुवात होते? आता पासून चिंता करायची गरज आहे का ? का तीस वर्ष नंतरच त्याची काळजी घेतली पाहिजे ? 
उत्तर: कोलेस्ट्रॉल अगदी लहानपणापासून जमायला सुरुवात होते?

प्रश्न: अनियमित भोजन घेण्याच्या सवयीने हृदयावर कसा परिणाम होतो?
उत्तर: अनियमित भोजन घेण्यामुळे शरीराला अन्न विरघळणारे अन्न स्त्राव कधी निर्माण करायचे ते समजत नाही परिणामी अन्न चांगले पचत नाही.

प्रश्न: मी औषधे न घेता कोलेस्ट्रॉल सामग्री नियंत्रण कसा करू शकतो?
उत्तर: नियंत्रित आहार, चालण्याची सवय आणि अक्रोड खावे.

प्रश्न: योगसाधना  हृदय रोगापासून वाचवाण्याला मदत करते का ? 
उत्तर: योग नक्कीच मदत करतात.

प्रश्न: हृदयासाठी चांगले आणि वाईट आहार कुठला? 
उत्तर: फळे आणि भाज्या चांगला आहार आहे  आणि तेल सर्वात वाईट. 

प्रश्न: कुठले तेल चांगले असते?  शेंगदाण्याचे, सुर्यफुल, ओलीव तेल?  
उत्तर: सर्व तेल खराब असतात.

प्रश्न: कुठले रुटीन चेकअप केले पाहिजे ?काही विशेष परीक्षण आहेत का? 
उत्तर: नियमित रक्त दाब परीक्षण कोलेस्ट्रॉल, शुगर सुनिश्चित करण्यासाठी, ट्रेडमिल टेस्ट.

प्रश्न: हृद्य झटका आल्यावर कुठले प्राथमिक उपचार केले पाहिजे?
उत्तर: झटका आलेल्या माणसाला झोपण्याच्या स्थितीत पडण्यासाठी मदत करावी. एक एस्पिरिन गोळी जर उपलब्ध असेल किंवा एक सोर्बित्रेत (sorbitrate) गोली जीभेखाली ठेवायला मदत करावी. त्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था करावी. कारण अधिकतम नुकसान पहिल्या एक तासात होते. 

प्रश्न: गॅसेस मुळे छातीत दुखणे आणि हृदयविकाराने छातीत दुखणे हे दोन्ही मधला फरक कसा समजावा?
उत्तर: ईसीजी केल्याशिवाय सांगणे अत्यंत कठीण असते. 

प्रश्न: तरुण  मुले/मुली मध्ये हृदय विकाराची समस्या वाढण्याचे कारण काय? ३०-४० वयोगटातील लोकांमध्ये हि समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे?
उत्तर: वाढत्या जागरुकतेने अशा घटनामध्येहि वाढ होत आहे, ह्या शिवाय आजची  जीवन शैली, धूम्रपान, जंक फूड, व्यायामाची कमतरता अशा कारणामुळे युरोप आणि अमेरिका सारख्या देशांपेक्षा आपल्या इथे हृदयरोगाच्या जास्त घटना घडताहेत.

प्रश्न:एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब हा १२०/८० ह्या सामान्य श्रेणी पेक्षा जास्त असेलआणि तरी सुद्धा तो व्यक्ती शारीरिक रित्या स्वस्थ असू शकतो का?
उत्तर: होय नक्कीच

प्रश्न: जवळच्या नात्यात केलेल्या लग्नामुळे होणाऱ्या मुलांना ह्याचा त्रास होऊ शकतो. हे खरे आहे का?
उत्तर: होय.

प्रश्न:आमच्या पैकी खूप लोकांची जीवनशैली अनियमित आहे व ऑफिस मध्ये उशिरा पर्यंत थांबणे हे आमच्या हृदयाला त्रासदायक होऊ शकते का? ह्यासाठी कुठली सावधानता बाळगायला सुचवाल ?
उत्तर: जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा निसर्ग ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. पण जेव्हा तुम्ही वयस्कर होत जाल तेव्हा जैविक घड्याळाचे (Biological Clock) ध्यान ठेवा.

प्रश्न: उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेले लोक टेन्शन कमी होण्यासाठी गोळ्या घेतात त्याचे लघु / दीर्घ परिणाम होऊ शकतात का?
उत्तर:कुठल्याही गोळ्यांना साईड एफेक्ट असू शकतात. पण आधुनिक गोळ्या ह्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून बनवल्या जातात.

प्रश्न:जास्त चहा/ कॉफी घेणे हृदयाला धोकादायक ठरू शकते का ?
उत्तर : नाही

प्रश्न : अस्थमा चा त्रास असलेले रोग्यांना ह्या आजाराची  जास्त भीती असते का?
उत्तर: नाही.

प्रश्न: तुम्ही जंक फूड कशाला म्हणाल?
उत्तर : तळलेले पदार्थ, मॅकडोनाल्ड,समोसे आणि अगदी मसाला डोसा सुद्धा.

प्रश्न: तुम्ही म्हटले कि अमेरिकन आणि युरोपिअन लोकांपेक्षा भारतीय लोकांन  तीन पटीने जास्त धोका असतो. ते लोक पण जास्त जंक फूड खातात.
उत्तर: प्रत्येक पिढी हि काही प्रकारच्या आजाराने आणि नशिबाने असुरक्षित असते. भारतात महागड्या रोगांची जोखम जास्त आहे.

प्रश्न: केळे खाल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते का ?
उत्तर : नाही.

प्रश्न: एखादा व्यक्ती हृदयचा झटका आला असता स्वत:ची मदत करू शकतो का ? कारण फोरवर्ड ईमेल मध्ये आम्ही असे नेहमी बघतो.
उत्तर: होय ! खाली आरामात आडवे झोपून घ्यावे आणि कुठलीही एस्पिरीन ची गोळी जिभेखाली धरावी. जवळ असणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगावे, अँब्युलंस ची वाट बघत बसू नये कारण शक्यतो अशा वेळेला त्या लवकर येत नाहीत.

प्रश्न: सफेद रक्त पेशी कमी असणे आणि हिमोग्लोबीन ची कमतरता हृदय रोगाला कारणीभूत ठरतात का ?
उत्तर: नाही, पण शरीरात योग्य मात्रात हिमोग्लोबीन असणे आवश्यक आहे.

प्रश्न: कधी कधी व्यस्त जीवनशैली असल्याने आम्ही व्यायाम करू शकत नाही पण अशा वेळेला जर आम्ही घरी चालत गेलो किंवा पायऱ्या चढलो तर ते फायदेमंद ठरेल का ?
उत्तर : नक्कीच. अर्ध्या तसा पेक्षा एका जागेवर बसने टाळा. एका खुर्ची वरून उठून दुसऱ्या खुर्ची वर बसने सुद्धा नक्कीच उपयोगी येते.  

प्रश्न: मधुमेह आणि हृदय रोग ह्यांचा संबंध आहे का ?
उत्तर: होय. मधुमेह रोग्यांना इतर माणसांपेक्षा झटका येण्याचे जास्त चान्सेस असतात.
प्रश्न: हृदयाचे ऑपरेशन केल्या नंतर काय काळजी घेतली पाहिजे ?
उत्तर: योग्य आहार, व्यायाम, वेळेवर औषधे घेणे आणि कोलेस्ट्रॉल, रक्तदाब व वजन ह्यावर नियंत्रण ठेवणे.

प्रश्न: रात्रपाळी चे काम करणाऱ्यांना दिवसपाळी करणाऱ्यांपेक्षा जास्त धोका असतो का ?
उत्तर: नाही.

प्रश्न: रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी आधुनिक औषधे कुठली आहेत?
उत्तर: अशी शेकडोनी औषधे आहेत. तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी नक्कीच बरोबर औषधे देतील पण माझ्या मता प्रमाणे गोळ्या घेण्यापेक्षा नैसर्गिक रीतीने रक्तदाब नियंत्रित करा, त्यासाठी व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.

प्रश्न:  डीसप्रिन आणि अन्य डोकेदुखीच्या गोळ्या रक्तदाब वाढवतात का ?
उत्तर : नाही.

प्रश्न:स्त्री आणि पुरुषांमध्ये हृदयरोगाचे काय प्रमाण आहे.
उत्तर: निसर्ग स्त्रियांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत जपतो /वाचवतो.

प्रश्न: हृदय चांगले ठेवण्यासाठी काय करू शकतो?
उत्तर : योग्य आहार, जंक फूड टाळा,व्यायाम करा, धुम्रपान सोडा, जर तुमचे वय ३० पेक्षा जास्त झाले असेल तर मेडिकल चेकअप करून घ्या. सहा महिन्यातून एकदा तरी चेकअप करावा.

वर झालेल्या संवादाचे मूळ इंग्रजी ईमेल इथे देत आहे.

A chat with Dr.Devi Shetty, Narayana Hrudayalaya (Heart Specialist) Bangalore was arranged by WIPRO for its employees. The transcript of the chat is given below. Useful for everyone.

Qn: What are the thumb rules for a layman to take care of his heart?
Ans:
1. Diet - Less of carbohydrate, more of protein, less oil
2. Exercise - Half an hour's walk, at least five days a week;avoid lifts and avoid sitting for a longtime
3. Quit smoking
4. Control weight
5. Control blood pressure and sugar

Qn: Is eating non-veg food (fish) good for the heart?

Ans: No

Qn: It's still a grave shock to hear that some apparently healthy person
gets a cardiac arrest. How do we understand it in perspective?

Ans: This is called silent attack; that is why we recommend everyone past the age of 30 to undergo routine health checkups.

Qn: Are heart diseases hereditary?

Ans: Yes
 
Qn: What are the ways in which the heart is stressed?What practices do you suggest to de-stress? Ans: Change your attitude towards life. Do not look for perfection in everything in life.

Qn: Is walking better than jogging or is more intensive exercise required to keep a healthy heart?

Ans: Walking is better than jogging since jogging leads to early fatigue and injury to joints.

Qn: You have done so much for the poor and needy.What has inspired you to do so? Ans: Mother Theresa , who was my patient


Qn: Can people with low blood pressure suffer heart diseases?

Ans: Extremely rare

Qn: Does cholesterol accumulates right from an early age
(I'm currently only 22) or do you have to worry about it only after you are above 30 years of age?

Ans: Cholesterol accumulates from childhood.

Qn: How do irregular eating habits affect the heart ?

Ans: You tend to eat junk food when the habits are irregular and your body's enzyme release for digestion gets confused.

Qn: How can I control cholesterol content without using medicines?

Ans: Control diet, walk and eat walnut.

Qn: Can yoga prevent heart ailments?

Ans: Yoga helps.

Qn: Which is the best and worst food for the heart?

Ans: Fruits and vegetables are the best and the worst is oil.

Qn: Which oil is better - groundnut, sunflower, olive?

Ans: All oils are bad .

Qn: What is the routine checkup one should go through?
Is there any specific test?
Ans: Routine blood test to ensure sugar, cholesterol is ok. Check BP,Treadmill test after an echo.

Qn: What are the first aid steps to be taken on a heart attack?

Ans: Help the person into a sleeping position , place an aspirin tablet under the tongue with a sorbitrate tablet if available, and rush him to a coronary care unit since the maximum casualty takes place within the first hour.

Qn: How do you differentiate between pain caused by a heart attack and
that caused due to gastric trouble?

Ans: Extremely difficult without ECG.
 
Qn: What is the main cause of a steep increase in heart problems amongst youngsters? I see people of about 30-40 yrs of age having heart attacks and serious heart problems.
Ans: Increased awareness has increased incidents. Also, sedentary lifestyles, smoking, junk food, lack of exercise in a country where people are genetically three times more vulnerable for heart attacks than Europeans and Americans.

Qn: Is it possible for a person to have BP outside the normal range of 120/80 and yet be perfectly healthy? Ans: Yes.


Qn: Marriages within close relatives can lead to heart problems for the child. Is it true? Ans : Yes, co-sanguinity leads to congenital abnormalities and you may not have a software engineer as a child.


Qn: Many of us have an irregular daily routine and many a times we have to stay late nights in office. Does this affect our heart ?What precautions would you recommend? Ans : When you are young, nature protects you against all these irregularities. However, as you grow older, respect the biological clock.


Qn: Will taking anti-hypertensive drugs cause some other complications (short / long term)?

Ans:Yes, most drugs have some side effects. However, modern anti-hypertensive drugs are extremely safe.

Qn: Will consuming more coffee/tea lead to heart attacks?
Ans : No.

Qn: Are asthma patients more prone to heart disease?
Ans : No.
 
Qn: How would you define junk food?
Ans : Fried food like Kentucky , McDonalds , samosas and even masala dosas.
 
Qn: You mentioned that Indians are three times more vulnerable.What is the reason for this, as Europeans and Americans also eat a lot of junk food?
Ans: Every race is vulnerable to some disease and unfortunately,Indians are vulnerable for the most expensive disease.

Qn: Does consuming bananas help reduce hypertension?

Ans : No.

Qn: Can a person help himself during a heart attack(Because we see a lot of forwarded emails on this)?
Ans : Yes. Lie down comfortably and put an aspirin tablet of any description under the tongue and ask someone to take you to the nearest coronary care unit without any delay and do not wait for the ambulance since most of the time,the ambulance does not turn up.

Qn: Do, in any way, low white blood cells and low hemoglobin count lead to heart problems?

Ans : No. But it is ideal to have normal hemoglobin level to increase your exercise capacity.

Qn: Sometimes, due to the hectic schedule we are not able to exercise. So, does walking while doing daily chores at home or climbing the stairs in the house, work as a substitute for exercise?
Ans : Certainly. Avoid sitting continuously for more than half an hour and even the act of getting out of the chair and going to another chair and sitting helps a lot..

Qn: Is there a relation between heart problems and blood sugar?
Ans: Yes. A strong relationship since diabetics are more vulnerable to heart attacks than non-diabetics.

Qn: What are the things one needs to take care of after a heart operation?  
Ans : Diet, exercise, drugs on time , Control cholesterol, BP, weight..

Qn: Are people working on night shifts more vulnerable to heart disease
when compared to day shift workers?

Ans : No.

Qn: What are the modern anti-hypertensive drugs?
Ans : There are hundreds of drugs and your doctor will chose the right combination for your problem, but my suggestion is to avoid the drugs and go for natural ways of controlling blood pressure by walk, diet to reduce weight and changing attitudes towards lifestyles.

Qn: Does dispirin or similar headache pills increase the risk of heart attacks?
Ans : No.

Qn: Why is the rate of heart attacks more in men than in women?
Ans : Nature protects women till the age of 45.

Qn: How can one keep the heart in a good condition?
Ans : Eat a healthy diet, avoid junk food, exercise everyday, do not smok and, go for health checkup s if you are past the age of 30(once in six months recommended) ...

Read More

Jaitapur Power Plant / जैतापूर अणु प्रकल्प

खूप दिवस झाले जैतापूर अणु प्रकल्पावर चर्चा झडताहेत. वर्तमानपत्रात रकाने भरून येताहेत. राजकीय नेते एकमेकांना खुले आव्हान करताहेत. ब्लॉग्ज लिहिले जाताहेत. खूप मोठी मोठी माणसे, समाजसेवक, शास्त्रज्ञ पुढे येऊन प्रतिक्रिया देताहेत. त्यात जपान मध्ये झालेला भूकंप आणि त्सुनामी ह्याने तर अजून भर टाकली. सर्व वाचन करून आणि अभ्यास करून सुद्धा मला काही गोष्टी खटकल्या. मी कोकणी असल्यामुळे आणि कोकणावर खूप प्रेम असल्यामुळे मलाही काही गोष्टी प्रकर्षाने मांडाव्याशा वाटताहेत. 

१. कोकण तसा म्हटला तर निसर्गाने समृद्ध असा प्रदेश आहे. पठारावर असणारा रखरखीतपणा येथे कमी आहे. कोकणी माणसाचे मुख्य उत्पन्न हे भात, आंबा आणि काजू आहे. बाकी येणारे उत्पन्न हे विकण्यापेक्षा खाण्यातच जास्त जाते. गेल्या काही वर्षापासून हापूस आंब्याला मिळालेली मागणी मुळे कोकणातल्या जमिनादाराना उत्पन्नाचे स्त्रोत मिळाले आहे. 

२. कोकणाला म्हणावे तसे कुशल नेतृत्व मिळालेच नाही. एक दोघे नेते सोडले तर कोकणाला दारिद्र्यातून बाहेर काढून विकासाची दिशा दाखवणारे कोणी भेटलेच नाही. निसर्गाचा वरदहस्त असूनही हा प्रदेश गरीबच राहिला आहे कारण चांगली दिशा दाखवणारा कोणी चांगला मार्गदर्शकच नाही मिळाला आहे. आज हि कोकणातली गावे एवढी मागासलेली आहे जेथे जायला पक्के रस्ते नाहीत. गावात दिवसभरात फक्त एकच एसटी येते. लोड शेडींग तर विचारू नका. अजूनही माझ्या गावात १० ते १२ तास लोडशेडिंग होते. गावात दोन पदरी रस्ते नाहीत. स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाली पण कुठल्याही अर्थसंकल्पात कोकणासाठी कधीच पकेज जाहीर केली गेली नाही. उलट महाराष्ट्रातील इतर प्रदेश साखर कारखान्याने समृद्ध झाले आहेत. कोकणाच्या हाती कोय आणि बाटाच आला आहे. 

३. आज हि कोकणातील शेतीला आणि प्यायला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहे. माझ्या गावात तर अजूनहि विहिरीचेच पाणी वापरले जाते. नळाचे पाणी तर अजून आलेच नाही. माझे गाव एवढे पण मागासलेले नाही आहे जिथे दुर्लक्ष होऊ शकते. सिंधुदुर्गातले महत्वाचे गाव आहे तरी सुद्धा पाण्याची डायरेक्ट लाईन घरापर्यंत आली नाही आहे. उतरता प्रदेश असल्याने सर्व पाणी ओहोळातून समुद्रात वाहून जाते. एखादी वर्षी पाउस पडला नाही तर कोकणी माणसाचे हाल होतात. अशा कोकणाकडे लक्ष द्यायला कधी कुठल्या राजकारणी माणसाला वेळ नाही भेटला. अचानक जैतापूर प्रकल्प टाकायला कशी आठवण झाली??? नवीन काही प्रयत्न ट्रायल बेसिस वर करायचे असतील आणि त्यात धोका असेल तर कोंकण नेहमीच ह्यांना दिसतो. एनरॉनच्या बाबतीत हे हेच झाले होते. माझा तर कुठल्याच राजकारणी नेत्यावर विश्वास राहिला नाही आहे. आज बोम्बलणारा नेता रात्री पेटी पोचली कि दुसऱ्या दिवशी एकदम शांत होतो आणि त्याच गोष्टीचे गुणगान गायला लागतो. एनरॉन त्याचा ढळढळीत  पुरावा आहे. 

४. काही लेखांमध्ये मी वाचले कि जैतापूर हा सेस्मिक झोन ३ मध्ये येतो आणि महाराष्ट्राला पर्यायाने जैतापूरला भूकंपाचा धोका खूप कमी आहे कारण हा पूर्ण ज्वालामुखी पासून बनलेला प्रदेश आहे. तसे जर असेल तर कोयना धरणाला का भूकंपाचे धक्के बसतात? आणि कोकण पेक्षा पठार आणि घाटमाथा जास्त सुरक्षित आहे. मग हा प्रकल्प तेथे का नाही होत आहे? जेव्हा काही चांगले प्रकल्प चालू करायचे असतात तेव्हा बारामती, लातूर, नांदेड अशा ठिकाणी आपले राजकारणी धावतात, अशा धोकादायक प्रकल्पाला ते आपल्या जिल्ह्यात कसे आणतील ? निदान ह्या प्रदेशातील लोकांना इतर उत्पनाचे साधने तरी आहेत कोकणात शेती,आंबा आणि काजू शिवाय काय आहे? जर प्रकल्पामुळे काही धोका झाला तर कोकणात काहीच उत्पन्नाचे साधन राहणार नाही. 

५. काही विचारवंत लिहिताहेत कि जैतापूर प्रकल्पाला लागणारी जमीन हि पडीक जमिनीतून वापरली जाणार आहे. त्यामुळे कोकणातील भात शेतीवर काही परिणाम होणार नाही? अशा पडीक जमिनी महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात हि आहेत कि ? कोकणातील जमीनच का ? कोकणातील पडीक जमिनी मध्ये किंवा काळा कातळ असलेली जमिनी मध्ये आजकाल आंब्याच्या कलमाची  लागवड होऊ शकते. कुठलीच जमीन अशी पडीक म्हणून घोषित करता येणार नाही. 

६. काही विचारवंत लिहिताहेत कि प्रकल्पाचे पाणी दूरवर (म्हणजे ५ किमी ?) सोडले जाईल ? समुद्रात पाच किमी वर टाकलेली एखादी वस्तू हि भरतीच्या वेळेला आरामात किनाऱ्यावर येते त्यात दुषित पाणी आणि पदार्थ बद्दल काय सांगायचे? माझे म्हणणे आहे जर आले तर काय करणार ? मासेमारी वर जगणारे लोकांना दुसरे उत्पन्न काय राहील? सरकार ने हा विचार केला आहे का? इंद्रायणी काठी होणारा डाऊ प्रकल्प त्याच कारणामुळे होऊ दिला गेला नाही. असे असते तर आपले मुंबईतले नाले का नाही लांब समुद्रात सोडत जेणेकरून ज्या काही चौपाटी उरल्या आहेत त्या तरी स्वच्छ राहतील. 

७. चेनोर्बील चा अपघात हा मनुष्य चुकी मुळे घडला आणि त्याची तुलना जैतापूर शी नको असे वारंवार सांगितले जाते? मनुष्य चुका होणार नाही ह्याची गॅरेंटी कोणी घेत आहे का? का नाही एखादाच्या हातून हि चुकी होऊ शकत? तशी ती चुकी दुसऱ्या जागी सुद्धा होऊ शकते पण तेथे दुसरे उत्पन्नाचे साधन उपलब्ध असेल. 

८. जरी पुढे मागे हा प्रकल्प झाला तरी भूमिहीन झालेल्यांना योग्य तो मोबदला मिळेल ह्याची काय गॅरेंटी? अजून कोयना प्रकल्पाचे, नर्मदा प्रकल्पाचे भू-मालकांना त्यांचे हिशोब चुकते व्हायचे बाकी आहेत. 

९. जपान मधला भूकंप आणि त्सुनामी कडे बघून तरी आपण थोडे शिकलो पाहिजे. समुद्राकाठीच परत अणुप्रकल्प उभारण्याची एवढी खाज का असावी? भूगर्भ शास्त्रज्ञांचा हवाला देऊन इथे भूकंप होणाच्या शक्यता कमी आहेत असे सांगितले जाते. आताच मटा मध्ये वाचले कि गेल्या २० वर्षात इथे ९२ भूकंप झाले आहेत आणि त्यात जास्तीत जास्त ६.२ स्केल चा आहे. आता प्रकल्प वाल्यांना हा कमी वाटतो आहे का? मटा मध्ये आलेला परिच्छेद तसाच इथे देतो.... 
जैतापूरला २० वर्षांत ९२ धक्केजैतापूर हे भूकंपप्रवण क्षेत्रात झोन ३ या विभागात येते. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नोंदणीत १९८५ ते २००५ या कालावधीत जैतापूरमध्ये ९२ भूकंप झाल्याची नोंद आहे. या पैकी सगळ्यात मोठा भूकंप ६.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. जैतापूरचा हा भूभाग अस्थिर असून मोठा भूकंप झाल्यास सरकारच्या आपत्ती निवारण यंत्रणा अशा किरणोत्साराच्या आपत्तीपासून कोंकण विभागाला वाचवण्यास कुचकामी ठरतील असे भूवैज्ञानीक आणि प्रकल्प विरोधक कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. 
JAITAPUR1
१०. समजा गृहीत धरू कि जमीन चांगली आहे, भूकंप विरोधी आहे. पण जर असा भूकंप समुद्रात झाला आणि त्सुनामीच्या प्रचंड लाटा आल्या तर प्रकल्पाला धक्का पोहचू शकत नाही का? संपूर्ण कोकण त्या चपेट मध्ये येऊ शकतो.

१०. फुकुशिमा अणुभट्टीत पहिला स्फोट झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, आज चौथ्या भट्टी ला आग लागली. जपान सारखा प्रगत देश जेव्हा नैसर्गिक आपत्तीत सापडतो तेव्हा आपल्या अणु भट्ट्या वाचवू शकत नाही तर आपल्या सारख्या देशाचे काय? अगदीच नाही तर कोकणात जायला रस्ते तरी पाहिजेत. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा प्रगत देशांचे काहीच चालत नाही तिथे आपली काय कथा?? असे प्रकल्प भूकंपप्रवण क्षेत्रात आणूच नये 

JAITAPUR2
११. जैतापुरचे भौगोलिक स्थान जर गुगल नकाशात बघितले तर ते समुद्रात किती जवळ आहे ते समजेल. त्सुनामी सारख्या लाटा जर आल्या तर त्यावर किती परिणाम होऊ शकतो ते बघा.

१२. पाकिस्तान ने आपले रंग आधीच दाखवले आहेत. उद्या जर त्यांनी लांबच्या मार्गाने येऊन जैतापूर जवळ काही सागरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आपण तो परतवू शकतो का? मी म्हणतो ते जरा अतिशयोक्तीच वाटेल पण आपले तटरक्षक दल आणि नौदल किती सक्षम आहे ते आपण मुंबई च्या २६/११ ला झालेल्या हल्ल्यात आणि १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात कोकणात उतरवलेल्या आरडीएक्स च्या वेळेला बघितले आहे. जैतापूर आल्यावर त्यांना जास्त काही करायची गरजच नाही पडणार. तुम्ही म्हणाल जपान सारख्या छोट्या देशाचे सर्व अणु प्लांट सागरी किनारी आहे. पण जपान हे बेटच आहे त्याला दुसरा पर्यायच नाही....पण आपल्याला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जपान ला पाकिस्तान सारखे क्षत्रू नाहीत आणि आपल्या सारखा आतंकवाद नाही. त्यामुळे एवढ्याश्या देशातहि खूप अणु प्लांट आहेत.
 JAITAPUR4 
(चित्रावर टिचकी मारून मोठे करू शकता)

१३. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश हे स्वत:च म्हणताहेत कि जपान मध्ये आलेली अणूआपत्ती हा भारतासाठी आणि सर्व देशांसाठी सावध अलार्म आहे.

"....Union Environment and Forests Minister Jairam Ramesh meanwhile said the nuclear crisis in Japan is a wake-up call for India and everyone else, adding additional safety measures would be specified for the Jaitapur nuclear power project...."

Read more: http://www.zeenews.com/news693597.html#ixzz1GmSNsqWk

१४. जर्मनीची कॉमार्झबँक (Germany’s Commerzbank ) हिने सुद्धा ह्या प्रोजेक्ट मधून अंग काढून घेतले आहे. कारण काय तर? "sustainability and reputational risk" म्हणजेच स्थिरता आणि आणि प्रतिष्ठेच्या भीती मुळे.

अणुशक्तीची गरज भारताला आहे आणि त्याचे महत्व मी नाकारत नाही पण सुपीक जमिनी अशा प्रकल्पाखाली घालून नापीक जमिनीवर शेतीचे प्रयोग करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा जेथे मनुष्यवस्ती कमी आहे, नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी आहे, निसर्गाला इजा पोहोचणार नाही अशा ठिकाणी आपण का नाही करू शकत. जाणूनबुजून धोंडा आपल्याच पायावर का मारून घ्यायचा? महाराष्ट्राला लोड शेडींग मधून बाहेर पडण्याची खूप गरज आहे आणि असे अणुप्रकल्प खरच खूप उपयोगी येतील पण कोकण तरी त्यासाठी नाही आहे.

Read More

जिंदगी कि मंजील...

           गेले तीन दिवस खूप बेकार गेले. परवा सकाळी ऑफिस मध्ये असताना माझ्या चुलत भावाचा फोन आला. त्याने सांगितले कि माझे चुलत काका आम्ही त्यांना भाईंदरचे काका म्हणायचो ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले.काही क्षण मला विश्वासच नाही बसला. मी परत परत विचारले. त्याने बातमी कन्फर्म केली. घरी फोन लावला तर घरी सुद्धा हि बातमी समजली होती. खूप कसेतरीच वाटले. एकदम अनपेक्षित होते. 

भाईंदरचे काका स्वभावाला खूप चांगले होते. सडपातळ, काटक बांधा, टिपिकल सहनशील कोकणी माणूस होते. स्वत:ची कामे स्वत:च करणे हा त्यांचा एक सर्वात चांगला गुणधर्म. विहिरीवर पाणी भरण्यापासून ते स्वत:चे जेवण करण्यापर्यंत सर्व कामे स्वत:च करायचे. त्यांनी कधीच कोणाला त्रास दिलेला मला तरी आठवत नाही. कधीच कोणाबद्दल वाईट बोलताना बघितले नाही, ऐकले नाही. कधी कोणाची इकडची बातमी तिकडे नाही कि कधी कोणामध्ये भांडणे नाही. आपण भले कि आपले काम भले हा त्यांचा स्वभाव. ते महिंद्रा कंपनी मध्ये कामाला होते. रिटायर झाल्यावर गावाच्या घरात जाऊन येऊन असायचे. आमची गावची जत्रा झाल्यावर त्यांचे कुटुंब मुंबईला आले आणि ते गावालाच राहिले होते. रात्री त्यांना त्रास झाला पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि दुसऱ्यादिवशी मोठा झटका आल्यामुळे ते आम्हाला सोडून गेले. 

मला आवडणाऱ्या काकांपैकी ते एक होते. वाईट एवढेच वाटते कि मी त्यांना हि गोष्ट सांगू शकलो नाही. एकदम उदास वाटले. आदल्यादिवशीच त्यांनी गावावरून आम्हाला भेट पाठवली होती. (कोकणामध्ये कोणी कधी खायच्या वस्तू दिल्यातर त्याला "भेट" असे म्हणतात.) आमचे कुटुंब गावाला जाऊ न शकल्यामुळे त्यांनी देवीचा प्रसाद आणि मालवणी खाजे पाठवले होते. सहसा कधी ते अशी भेट कधीच पाठवत नाही. पण ह्या वर्षी त्यांनी ती दुसऱ्या एका नातेवाईकांकडून पाठवली होती. आम्ही घरात चर्चा पण केली कि काकांनी ह्या वर्षी कशी भेट पाठवली? आई म्हणाली कि त्यांचा माझ्या पप्पांवर खूप जीव आहे म्हणून पाठवली असेल. ते चुलत असले तरी एकमेकांना सख्ख्या भावासारखे होते. त्यांनी भेट पाठवली ह्याचा आनंद पण झाला. खूप बरे वाटले. आणि दुसऱ्या दिवशी अशी बातमी आली त्यामुळे त्याहून जास्त वाईट वाटले. पप्पांना पण बातमी ऐकून खूप वाईट वाटले त्यांचा चेहरा खूप उदास झाला होता. मूड पूर्ण उतरला होता. खूप अपसेट वाटले. 

जे जन्माला आले ते जाणार हे तर विधिलिखितच असते पण काही माणसे जाता जाता अशी मनाला चुटपुट का लावून जातात?ते समजत नाही.  का त्यांनी ह्यावर्षीच आम्हाला भेट पाठवली? दीडशे च्या वर सदस्य असलेल्या आमच्या कुटुंबापैकी त्यांनी आम्हालाच का भेट पाठवली? असे का ?त्यांना आपल्या जाण्याचा संकेत मिळाला होता का ? काही मागचे पुढचे ऋण बाकी होते का ? का आम्ही त्यांची आठवण शेवटपर्यंत काढावी अशी त्यांची इच्छा होती का ? त्यांच्या मनात काय होते ते तेच जाणो. पण  मी काकांना खूप मीस करेन. त्यांनी दिलेल्या भेटीचे ओझे आता जन्मभर मनावर राहून जाईल त्याची परतफेड करता येणार नाही. वाईट जास्त ह्याचेच वाटेल कि मी माझ्या त्यांच्याबद्दल असलेल्या फीलिंग्स त्यांना सांगू शकलो नाही आणि आता कधी सांगूहि शकणार नाही.
कोणत्या व्यक्ती ला सांगायचे असेल कि ती तुम्हाला आवडते तर ते सांगायची वाट पाहू नका. चुकून उशीर झाला तर स्वत:ला माफ करावेसे वाटत नाही.
---------
त्या धक्क्यातून सावरत नाही तो पर्यंत आज माझ्या मित्राचा फोन आला त्याने सांगितले कि माझ्या प्रसाद नावाच्या एका मित्राची आजी हृदयविकाराच्या झटक्याने वारली. ८५ हून जास्त वय झाले होते. गेले पंधरा दिवस ती हॉस्पिटल मध्ये होती अगदी शेवट पर्यंत ती बोलत होती. स्मृती शेवटपर्यंत चांगली होती. पण शरीराने साथ सोडली होती. डॉक्टरांनी सांगितले होते कि आता तिला परत मोठा झटका येणार आहे. तिचे जगण्याचे चान्सेस खुपच कमी आहेत. ऑफिस मधून पोहचे पर्यंत तिला शेवटचे बघायला पण नाही मिळाले. ठाण्यात पोहोचल्यावर मित्राला फोन लावला त्याने सांगितले आता आम्ही स्मशान भूमी कडेच चाललो आहे. तू डायरेक्ट तिथेच ये. दुसऱ्या एका नातेवाईकाने स्मशानभूमी कडे यायचा रस्ता फोनवरच सांगितला. खारेगावच्या स्मशानभूमीत जायचे होते. खारेगावला गेलो असल्यामुळे थोडा फार रस्ता माहित होता. त्या पुढे त्याने जे काही लेफ्ट राईट सांगितले ते सर्व डोक्यावरून गेले. म्हटले तिथे जाऊन बघू मग विचारत विचारत जाता येईल. 

तिथे पोचल्यावर इकडे तिकडे बघितले तर रस्त्यावर फुले दिसली. मनात आले कि बहुतेक हि प्रेतयात्रेचीच फुले असावीत. त्याचा मागोवा घेत लेफ्ट राईट करत करत गावाच्या एकदम दुसऱ्या टोकाला पोहोचलो. रेल्वेच्या ब्रीज खालून गेलो तर पुढे एकदम सुनसान रस्ता दिसला रस्त्यावर कोणीच नव्हते आणि फुले पण दिसत नव्हती. थोडे पुढे एक बल्बचा अंधुक प्रकाश दिसत होता. तसाच पुढे गेलो. तर भरपूर माणसे दिसली तेव्हा अंदाज केला हीच स्मशानभूमी असणार. 

बाईक पार्क केली आणि आत प्रवेश केला. आयुष्यात पहिल्यांदाच स्मशानभूमीत गेलो होतो. मनात असलेल्या कल्पनेप्रमानेच खूप भयाण होती. बल्ब च्या अपुऱ्या प्रकाशात पूर्ण स्मशानभूमी दिसत होती. स्मशानात दोन चितेची व्यवस्था होती. दुसऱ्या चितेवर नुकतीच कोणाला तरी अग्नी दिली होती. त्याची अग्नी पूर्णपणे विझली सुद्धा नव्हती. लाल लाल निखारे अजून हि आतल्याआत जळत होते. पाठीमागे दोन कट्टे होते बहुतेक प्रेत ठेवायला जागा होती. इतर वेळेला चांगली वाटणारी अष्टर आणि झेंडूची फुले स्मशानभूमीत नकोशी वाटत होती. 

आजीला तिरडीवरून उतरवून नुकतेच चिते वर ठेवले होते. भटजी काहीतरी मंत्र म्हणत तिच्या मुलाला पाण्याची घागर हातात देत होते. मग त्यांनी हातात पाणी घेऊन अंगठ्याने आजीला पाणी भरवले. मग एकेक करत सर्व जमलेल्यानी अंगठ्यांनी पाणी भरवले. स्मशानात कामाला असलेले रॉकेलचा डब्यातून रॉकेल काढून मशालीवर ओतत होते. त्यांना बहुतेक सर्व लवकर उरकायची घाई लागली होती. तोंडात पाणी घालून झाल्यावर कामगारांनी लाकडे ठेवायला सुरुवात केली. त्याचवेळेला त्यांच्या घरातल्या माणसाला काहीतरी आणायला जावे लागल्यामुळे मी त्याला बाईक वर घेऊन गेलो तोपर्यंत चितेला अग्नी दिला गेला होता. 

मी येईपर्यंत चिता पूर्णपणे जळायला लागली होती. ८५ वर्षेहून अधिक जगलेल्या व्यक्तीचा असा अंत बघून खूप वाईट वाटले. सुरुवातीला जेव्हा आजीला माझ्या बायकोची ओळख करून दिली होती तेव्हा तिला तीला माझी बायकोचा स्वभाव आणि वागणे खूप आवडली होती. तिच्यासारख्या कट्टर कोंकणी बाई कडून कौतुक होणे म्हणजे बायकोसाठी मोठे सर्टिफिकेटच होते. माझ्यासाठी सुद्धा ते खूप स्पेशल होते. तिथे काहींची सांत्वनपर भाषणे झाले. सर्वानी दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वाहिली आणि सर्वजण हळूहळू बाहेर पडायला लागले. कामगार सर्व बाजूने चितेवर रॉकेल टाकत होते. चिता पूर्णपणे जळते आहे कि नाही ते बघत होते. चार पैकी दोघेजण आशेने नातेवाईकांकडे बघत होते. ते समजल्यामुळे एका नातेवाईकाने दोनशे रुपये काढून दिले आणि चौघात वाटून घ्यायला सांगितले. 

आता माणसाच्या प्रवृत्तीला काय बोलणार? दु:खात असलेल्या नातेवाईकांकडे आशेने बघायचे आणि आपण पण दु:खी असूनही त्यांना बक्षीस द्यायचे. का ?तर त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला ह्या शरीरधर्मातून मुक्त करायला मदत केली म्हणून? तिच्या प्रेतावर लाकडे ठेवली म्हणून? कि तिचे प्रेत पूर्णपणे जळावे ह्या साठी चारही बाजूने रॉकेल टाकले म्हणून? 
पण काय करणार त्यांच्या बाजूने विचार केला तर तेही बरोबरच आहेत. तेच त्यांची कमाई आहे. त्याच पैश्यावर त्यांचे घर, कुटुंब पोसले जात असेल, मुलांना खायला पियाला मिळत असेल. असो मेहनत करताहेत निदान ते भीक तर नाही मागत आहे ना !! एवढेच एक समाधान!!

खरे तर ह्या गोष्टी ब्लॉग वर टाकण्यासारख्या नव्हत्या पण मनातले स्पंदने, विचार आणि भावनांच्या लाटा स्वस्थ बसू देत नव्हत्या.  कुठे तरी मन मोकळे करावेसे वाटत होते. कुठे ते समजत नव्हते म्हणून सरळ लिहायला बसलो. अशी कुठली पोस्ट लिहिताना किमान दोन दिवस तरी लागतात. पण आज मनात एवढा भावनांचा कल्लोळ उठला होता कि त्यातून उमडणाऱ्या तुफानातून एका तासात एवढी मोठी पोस्ट लिहून झाली.परत न वाचता, व्याकरण न तपासता सरळ पब्लिश करणार आहे कारण ती मनातून जशीच्या तशी उतरली आहे.

आता जरा हलके वाटायला लागले आहे. निदान शांत झोप तरी येईल.

मागे एका स्मशानभूमीच्या बाहेर असलेल्या बगीच्यात एक पाटी बघितली होती.

जनाब आ गये तुम ??
आईये !! ऐसे मायूस क्यू हो ?
तुम्हारी मंजील तो यही थी...
सिर्फ आते आते जिंदगी गुजर गयी.....

सहसा शेरोशायरी,कविता माझ्या कधीच लक्षात राहत नाही पण हे वाक्य डोक्यात अगदी फिट्ट बसले आहे 

देव करो मृतात्म्याला शांती आणि मुक्ती देवो.

Read More

दोन तासाचा प्रवास


मागच्या शनिवारी सकाळी धावत धावत घरातून निघालो. बाईक काढली आणि कंपनीची बस पकडायला गेलो. बाईक पुलाखाली पार्क केली आणि स्टॉप वर पोहोचलो. नेहमीप्रमाणे बस नुकतीच निघून गेली होती. नेहमीप्रमाणे अशासाठी कि गेले 8 शनिवारी मी बस पकडू शकलो नाही आहे. इतर दिवशी बस बरोबर मिळते पण शनिवारीच का चुकते ते मला अजून समजले नाही. उलट शनिवारी बस १० मिनिटे लेट असते. कदाचित तेच कारण असू शकेल. 

असो तर मी स्टॉप वर जाऊन उभा राहिलो विचार केला आता बेस्ट ची बस पकडून जावे लागणार. बेस्ट ची बस पकडण्यासाठी मुलुंड च्या चेक नाक्यावर जावे लागते. तिथे जाईपर्यंत ऑटो ने कमीत कमी 25 ते 30 रुपये होतात. आणि पुढे एसी (Air condition) बस ने ऑफिस ला जायाला 35 रुपयाचे तिकीट लागते. ऑटो मध्ये बसण्याआधी मी नेहमी पैसे आहेत कि नाही ते चेक करतो. आणि नेमके त्यादिवशी माझी पर्स रिकामी होती. एटिएम मधून पैसे काढायला विसरलो होतो. जवळपास कुठेही एटिएम नव्हते. मला सवय आहे सुट्टे पैसे किंवा दहा रुपयाच्या नोटा मी पर्सच्या कानाकोपर्‍यात घुसवून ठेवतो. आयत्यावेळेल्या उपयोगी पडतात म्हणून. इकडून तिकडून सर्व मिळून ६३ रुपये मिळाले. म्हटले चला ट्राय करून बघुया. ज्या रुट ने जाणार होतो त्या रुट वर एकहि बॅंकेचे एटीएम नाही आहे. भीती होती फक्त ऑटोची, कधी कधी मीटर ऑटो पेक्षा जास्त पळतात म्हणून. पण नशिबाने ऑटो चे २५ झाले आणि बसचे ३५ झाले आणि ३ रुपये उरले म्हणून वर्तमानपत्र घेतले वाचायला. एसी बस चा भरवसा नसतो. चायना मेड असल्यामुळे रस्त्यात कधीही गरम होऊन बंद पडतात पण नशीब जोरावर होते म्हणून ऑफिसला सुखरूप पोचलो. 
       मी ऑटो तून उतरत असतानाच अगदी रिकामी बस समोरून गेली होती. त्यामुळे स्टॉप वर कोणीच नव्हते मीच पहिला होतो. पेपर वाचत उभा राहिलो. ४/५ मिनिटातच अजून ७/८ लोक येऊन उभी राहिली बस स्टॉप भरून गेला. तेव्हढ्यात समोरून एक जवळपास ६० ते ६५ वर्षाची म्हातारी बाई आली आणि डायरेक्ट माझ्या समोरच उभी राहिली. मी पहिलाच होतो. पण मी काही हटकले नाही. सहसा म्हातारे आणि अपंग असतील तर मी लाईन मध्ये घुसले तरी काही बोलत नाही. बाकीचे पण कोणी काहीच बोलले नाही. तिच्या मागोमाग एक अर्धांग वायू झालेला, गॉगल लावलेला आणि ए के हंगल सारखा दिसणारा म्हातारा आला. तिने हात देऊन त्याला स्टॉप वर चढवून लाईन मध्ये घेतले. मी सरकून बसायला जागा दिली. 

म्हातार्‍या बाईने विचारले, "This line is for Andheri na ?" 

मी उत्तर दिले, ‘yes Andheri only’ 

माझ्या आधी तिने डेपोत आणि एका कंडक्टरला विचारले होते पण परत खात्री करून घेतली होती. म्हातारा बहुतेक तिच्या मागे चालून वैतागला होता. तो बसला आणि घाम पुसत बोलला " अभी ८ ही बजे है, फिर भी बहुत धूप है, We should have take an Auto!” 

म्हातारी.,'See!! now you are retired and we have limited money. Auto will take minimum Rs 300 for Andheri. We will go by bus only. 

म्हातारा,’ but, we….. 

म्हातारी, okay keep quite now… 

म्हातारा उगाच आपला कपाळावरचा आणि अर्ध्या पडलेल्या टकल्यावरचा घाम पुसत राहिला. 

मी विचार केला चला ह्यांची ऑटोची कॅपासिटी नाही निदान एसी बस ची तरी आहे. बिचारा म्हातार्‍याचा त्रास कमी होईल. 

१० मिनिटे झाली बस आली नाही तशी सर्वाची चुळबुळ चालू झाली. काही जण कंडक्टर च्या केबिन कडे बघून बडबड करायला लागले. म्हातारा घाम पुसतच होता. तेव्हढ्यात दोन एसी बस समोर येऊन उभ्या राहिल्या. आता म्हातारीची चुळबुळ चालू झाली. ड्रायवर उतरून त्यांच्या केबिन कडे चहा प्यायला निघून गेले. म्हातारीने इकडे तिकडे बघून माझ्या मागच्या माणसाला विचारले. (कदाचित मला विचारून झाले होते म्हणून), This line is for Andheri na ? 

त्या माणसाने सांगितले, “yes for andheri only’ 

म्हातारी 'But is it for normal BEST bus ?' 

तो माणूस, 'No this line is for A/c bus and normal bus queue is at opposite site.'

म्हातारीने त्या म्हातार्‍याला हात धरून उठवले आणि चालायला सांगितले. तो बिचारा वैतागून तिच्या मागे मागे पाय ओढत चालत राहिला. 
आता माझ्या मनात काय काय विचार आले ते लिहायला गेलो तर ब्लॉग हि कमी पडेल. एक निर्णय घेतला कि लवकरच निवृत्त झाल्यानंतरचा उपयोगी येणारा पेन्शन प्लॅन घ्यायचा आणि गुंतवणूक चालू करायची. 

बस आली बस मध्ये बसलो. ग़र्दी नसल्याने प्रत्येक जन विंडो सीट वर बसले. दोन स्टॉप गेल्यावर एक जाडसा माणूस बस मध्ये आला. सीट बघत बघत माझ्या बाजूला बसायला आला. मनात म्हटले झाले कल्याण, मी पण जाडा आता सीट वर मारामारी होणार. पण अचानक त्याचे लक्ष मागच्या सीट वर गेले आणि तिथला माणूस त्याचा ओळखीचा निघाला. 

अरे तू ? 
अरे तू? कसा आहेस ?? 
मजेत !!! 
तू कसा इथे ? 
अरे मी दररोज ह्याच बस ने जातो. 
अच्छा मी आज लेट झालो. 

तो मागे बसायला गेला. मी हुश्श केले. 

त्यांच्या गप्पा चालू झाल्या. नवीन चढलेल्या माणसाचा आवाज जरा मोठा होता त्यामुळे सर्व गप्पा ऐकायला येत होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. मग पहिल्याने विचारले तुझा भाऊ कसा आहे? लग्न झाले का? 

दुसरा: हो काही विचारू नकोस, लग्न झाले एक गोड मुलगी पण आहे. पण त्याने जाम वैताग आणला आहे. 

पहिला :का काय झाले ? 

दुसरा : अरे जाम पितो रे ? सर्व कमावतो ते सगळे दारूत उडवतो. बायका पोरांकडे पण बघत नाही. 

पहिला: काय प्रोब्लेम आहे का ?टेंशन आहे का ? 

दुसरा: अरे काही नाही अंगात मस्ती दुसरे काय? 

पहिला: अरे मग झापाडवायचे ना..लहान भाऊ आहे ना तुझा. मी असतो तर चांगल सुतासारखा सरळ केला असता. 
दुसरा: अरे तो काय लहान राहिला आहे का मारायला? नशेत माझ्यावरच हात उचलायचा. माझ्या बायकोला वासाचा त्रास होतो ति कटकट करत राहते. मागेच त्याला घराबाहेर काढले आणि वेगळे राहायला सांगितले. आई पण खूप रागावते त्याला. पण काही फरक नाही. वेगळा राहिला तर निदान जवाबदारी ने वागेल म्हणुन आम्ही त्याला भाड्याने घर हि घेउन दिले. पण कसले काय? 

पहिला: अरेरे ! साल्याला काठीने बदडावयाला पाहिजे. 

दुसरा: त्यादिवशी आई ने जेवायला घरी बोलावले होते. त्याची बायको आणि मुलगी आली होती. हा भाई रात्री १० वाजता आला ते सुद्धा फुल टाईट होऊन. चालायला पण जमत नव्हते. आई जाम ओरडत होती पण तो शुद्धीवर असायला पाहिजे न ऐकायला. 

पहिला: अरे काय यार ! एक दिवस चांगला थोबडावून सरळ करायचा ना !!!

दुसरा: काय बायको आणि पोरी समोर मारणार रे? 

पहिला: अरे अश्या साल्यांना टायर मध्ये घालुन मारले पाहिजे. मी असलो असतो ना तर..... 
(बहुतेक हा पोलिस खात्यात असला पाहिजे ....माझा अंदाज) 

दुसरा: मी विचार करतोय त्याला जरा एकदिवशी विजेचा झटका द्यायचा. जमला तर एक दिवसी तशी अँरेंजमेंट करणार आहे. आपला प्लग मधून येणारा विजेचा लोड किती असतो रे? त्याने माणूस मरत तर नाही ना? 

पहिला: ते बाबा मला काही माहित नाही ती माझी फिल्ड नाही रे? 
(आवाजातली जरब जरा कमी झाली.)

दुसरा: कोणी माहिती आहे का असे सांगणारा ? 

पहिला: नाही रे ! तू थोडासा झटका देऊन बटन बंद करू शकतो. 

दुसरा: हा रे! तसच काहीतरी करावे लागणार बहुतेक. माझ्या ऑफिस मध्ये कोणाला तरी विचारून बघतो. जाम डोक्याला त्रास होतोय रे. काय करणार साला सुधारतच नाही. 

पहिला: हम्म्म्म !!! 
(बहुतेक पहिल्या माणसाची हवा टाईट झाली असावी त्याने काहिच उत्तर नाही दिले.) 

दुसरा: साल्याला पुढच्या आठवड्यात जेवायला बोलावतो आणि पंख किंवा लाईट चालू करायला सांगतो आणि झटकाच देतो. साला असा लाईन वर येणार नाही. 

पहिला: हम्म्म्म ! बघ काय ते... 
(माझी खात्री पटली नक्कीच पोलीस नसावा)

पहिल्याने संभाषण थांबवण्याचे संकेत दिले. पण दुसरा माणूस फुल फॉर्म मध्ये होता.त्याची बडबड चालूच होती. त्याच्या डोक्यात लाईट चा करंट, प्लग, शॉक ह्याच गोष्टी फिरत होत्या. पहिला माणूस फक्त हो, हम्म करत होता.

मी पण कानात हेड फोन लावला आणि काय जमाना आलाय, भाऊ भावावरच उठलाय असे विचार करत मी पण शांत पणे झोपून डुलक्या काढायला लागलो. 

आता दुसरे काय करणार ???
दोन तासाच्या प्रवासात किती वेगळेच अनुभव आले.

Read More